Posts

Showing posts from August, 2025
Image
  दिवा प्रभाग समितीवर धडक मोर्चा  अनेक दिवसांपासून जनतेच्या समस्यांबाबत थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढू धोरणाच्या विरोधात पन्नास गावातील भूमिपुत्र एकवटले. मुबंई प्रतिनीधी :  सतिश पाटील :- आगरी समाजातील सर्व सर्व  संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली.सहाय्यक आयुक्तांना तसेच बांधकाम साहाय्यक बांधकाम अधिकार्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.गेल्या वर्षीसुद्धा निवेदन दिले होते.या वर्षी देखील निवेदन देऊन आधिकारी वर्ग दखल घेत नाहीत त्यामुळे भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला.जर नागरिकांच्या  समस्यां तुम्हाला सोडवता येत नसतील,तर तुम्ही खुर्चीवर बसता कशाला, जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार दिला जातो याचे भान ठेवून काम करा.मंगळवार २६ऑगस्ट२०२५पर्यत नैसर्गिक नाले बिल्डर, विकासक यांनी बंद केले आहेत त्यामुळे दोन वर्ष सतत गावातील लोकांच्या घरात पाणी घुसून आर्थिक नुकसान होत असून ती त्वरित वसूल करून द्यावी या शासनाकडून द्यावी.अन्यथा सर्व बाधीत गावकरी ,भूमिपुत्र प्रभाग समितीला टाळे ठोकणार असा कडक इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सचिव ह.भ.प.संतोष केणे आणि भूमिपुत्रानी दिला ...
Image
  बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत  पोलीस आयुक्त परिमंडळ ७ मुंबई   गणेशोत्सव २०२५ धार्मिक उत्सव शांततेत व गालबोट न लागता साजरे करा आणि पोलीसांना सहकार्य करा. मुंबई प्रतिनीधी : सतिश पाटील :- गणेशोत्सव मंडळ व पोलीस संवाद कार्यक्रम महाकवी कालिदास नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता.मा.डाॅ.श्री.महेश पाटील - (अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मुंबई) मा.श्री.राकेश ओला-(पोलीस उपआयुक्त परिमंडळ  ७ मुंबई ) संदीप मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त मुलुंड विभाग) अजय जोशी( वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुलुंड ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुलुंड विभाग, भांडूप विभाग,बृहन्मुंबई पालिका 'टी' विभाग.मुलुंड, 'एस' विभाग भांडूप, अग्निशमन दल मुलुंड सर्व उपनगरातील गणेशोत्सव मंडळ व पदाधिकारी ,पत्रकार यांची उपस्थिती होती. विषय : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते , पत्रकार, समाज सुधारक लोकमान्य टिळकांनी सर्व जनतेला एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना १८९३ केली सर्व जाती धर्मातील लोक एकोप्यांनी नांदावे स्वातंत्र्य चळवळीचे धडे देतात यावे अ...
Image
  पेण - वडखळ येथे झालेली JSW स्टील प्लांट व जेटी विस्ताराची पर्यावरणीय जनसुनावणी ही केवळ एक सरकारी औपचारिकता ठरली मुंबई : सतीश पाटील :- खरी जनता, खरे प्रश्न, खरी वेदना, सगळे या गर्दीत हरवून गेले. प्रदूषण, पाण्याचे प्रश्न, मास्यांचा नाश, जमिनीचे नुकसान, बांध-बंधिस्तीचे, मॅन्ग्रोज नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर चर्चा आज व्हायला हवी होती.  लोकशाही प्रक्रियेतील ही सुनावणी म्हणजे जनतेचे म्हणणे ऐकून घेणे, पर्यावरणावर होणारे परिणाम अभ्यासणे, व ते उपाययोजनांच्या स्वरूपात पुढे नेणे, हा या प्रक्रियेचा मूळ उद्देश. पण या सुनावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर असे जाणवले की हा उद्देश पूर्णपणे हरवला आहे. कंपनीने आपले कर्मचारी, ठेकेदार, पैशाने विकत घेतलेले काही स्थानिक व लाभाच्या आशेवर नुकतेच दहा-पंधरा दिवसां पासून जोडून घेतलेली माणसे बसभरून, गाडया भरून आणून सुनावणीचे मैदान भरले. खरी जनता, खरे प्रश्न, खरी वेदना, सगळे या गर्दीत हरवून गेले. प्रदूषण, पाण्याचे प्रश्न, मास्यांचा नाश, जमिनीचे नुकसान, बांध-बंधिस्तीचे, मॅन्ग्रोज नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर चर्चा आज व्हायला हवी होती. पण...
Image
  शहरात प्रचंड प्रमाणात घाण, कचरा पसरलेला असताना मुख्याधिकारी यांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळालाच कसा ? नागरिकांना पडला प्रश्न तळा : नजीर पठाण :- अखंड खोपोलीत रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोच कसा हा गंभीर प्रश्न आहे. मुख्याधिकाऱ्यांना सदर पुरस्कार देण्याच्या अगोदर शासनाने शहराची पाहणी केली होती का ? कोणत्या नियमांच्या अनुसार सदर पुरस्कार देण्यात आलेला आहे ? शहरात प्रचंड प्रमाणात घाण कचरा आहे अशा नागरिकांच्या प्रचंड तक्रारी येत असताना शहराचे मुख्याधिकारी यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे जगातील आठवे आश्चर्य आहे.  शहरातील सर्व प्रभागांचा दौरा करून प्रत्येक वार्डातील असलेले घाण, कचरा यांचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करणार आहे व खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची पोलखोल करणार असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा कीट नाही, शहरातील सफाईची दाणादाण उडालेली असताना, प्रचंड प्रमाणात ...
Image
  डॉ. सनौल्लह घरटकर  यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिर संपन्न.  तळा : नझीर पठाण  :- संजीवनी संस्था मुरुड व डॉ सनौल्लह घरटकर  यांच्या विद्यमानेदर वर्षी प्रमाणे २३ ऑगस्ट हा डॉ सनौल्लह घरटकर साहेब यांच्या जन्मदिनी(वाढदिवसा) निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून वाढदिवस साजरा केला जातो.  त्यामध्ये अंजुमन इस्लाम जंजिरा आय टी आय मुरुड जंजिरा चे प्राध्यापक आणि कर्मचारीमोठ्या प्रमाणात 'रक्त दान हे श्रेष्ठ दान" रक्तदान करून सीमेवरील सैनीकांसाठी,आजारी पेशंटसाठी अपघातग्रस्त व्यक्तीं ना रक्ताची गरज भागवून प्राण वाचवू शकतो या उद्देशाने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला त्याकरीता संजीवनी संस्था तर्फे प्राध्यापक  इष्टियाक् सर, जाहूर कादरी आणि विजय सुर्वे यांचा तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आय टी आय च्या चेअरमन समीर दवानक सर  यांनी प्राध्यापक इष्टियाक् सर आणि सहकारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानले....
Image
  रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस कोलाड आंबेवाडी नाक्यावर पूरपरिस्थि.. वाहन चालकाना मार्ग काढताना तारेवरची कसरत,जनजीवन विस्कळीत, कोलाड : राकेश हुले :- रायगड जिल्ह्यात गेली तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका, महिसदरा या नद्या तुडूंब दुथडी भरून वाहत असून डोंगर दऱ्यातून वाहणारे नाले देखील धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे भरून वाहत असल्याने, मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरिल मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदार यांना बसला आहे. काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धो धो मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चौपदरी करण्याच्या भरावाचा तसेच अर्धवड उड्डाण पुलांचे काम त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे केलेले गटारांची कामे याचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.तर कोलाड आंबेवाडी नाक्यावर कै द ग तटकरे चौकात पाणी साचल्याने रोहा कडे येणाऱ्या तसेच मुंबई केक जाणाऱ्या वाहन चालकाना चौकातून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरच...