
दिवा प्रभाग समितीवर धडक मोर्चा अनेक दिवसांपासून जनतेच्या समस्यांबाबत थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढू धोरणाच्या विरोधात पन्नास गावातील भूमिपुत्र एकवटले. मुबंई प्रतिनीधी : सतिश पाटील :- आगरी समाजातील सर्व सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली.सहाय्यक आयुक्तांना तसेच बांधकाम साहाय्यक बांधकाम अधिकार्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.गेल्या वर्षीसुद्धा निवेदन दिले होते.या वर्षी देखील निवेदन देऊन आधिकारी वर्ग दखल घेत नाहीत त्यामुळे भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला.जर नागरिकांच्या समस्यां तुम्हाला सोडवता येत नसतील,तर तुम्ही खुर्चीवर बसता कशाला, जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार दिला जातो याचे भान ठेवून काम करा.मंगळवार २६ऑगस्ट२०२५पर्यत नैसर्गिक नाले बिल्डर, विकासक यांनी बंद केले आहेत त्यामुळे दोन वर्ष सतत गावातील लोकांच्या घरात पाणी घुसून आर्थिक नुकसान होत असून ती त्वरित वसूल करून द्यावी या शासनाकडून द्यावी.अन्यथा सर्व बाधीत गावकरी ,भूमिपुत्र प्रभाग समितीला टाळे ठोकणार असा कडक इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सचिव ह.भ.प.संतोष केणे आणि भूमिपुत्रानी दिला ...