Posts

Showing posts from May, 2025
Image
 कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335  रायगड : प्रतिनिधी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकार...
Image
  जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट: कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना रायगड : प्रतिनिधी :-  रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूूचना त्यांनी यावेळी केल्या.  यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी  रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते, किती रुग्णांना संदर्भाकित केले जाते, त्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली. या शिवाय काही रुग्णांशी संवादही साधला.  दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या, विनाकारण रुग्णांना संदर्भाकित करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत. तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणुक द्यावी. एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूच...
Image
 
Image
 
Image
  रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी रायगड : प्रतिनिधी :- भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर...
Image
  भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन रायगड : प्रतिनिधी  :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' ची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist ट्रेन अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. या 5 ...
Image
  अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी रायगड : प्रतिनिधी  :- अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग ते धरमतर या मार्गांवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन  जावळे यांनी याठिकाणी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, या मार्गांवरून मांडवा जलवाहतूक सेवा, पर्यटकांची वाहने तसेच डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सारखी अवजड वाहने एकाच वेळी ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता, दि. १७ व १८ मे २०२५ आणि दि. २४ व २५ मे २०२५ या दोन आठवड्यांत सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत या मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे. ही व...
Image
  शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा -- रोहयो मंत्री भरत गोगावले रायगड : प्रतिनिधी : - रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.  उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ.  त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने...
Image
  जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संच (एफटीके) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले   रायगड : प्रतिनिधी :- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी येत्या दि.12 मे ते 7 जून 2025 या कालावधीत जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व 1831 गावामध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले यांनी दिली. पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेतंर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.या मोहिमेतंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक एफ.टी.के.प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ.टी.के.कि...
Image
 "ऑपरेशन अभ्यास" मॉक ड्रिल उद्या उरणमध्ये नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे रायगड : प्रतिनिधी  :- केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ. या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. उरण शहरातील खालील सात ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत. तहसिल कार्यालय, उरण, ONGC कॉलनी,ग्रुप ग्रामपंचायत, चाणजे, GTPS कंपनी, बोकडविरा, बारमर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, कोप्रोली, बल्क गेट कंपनी, मोरा या दरम्यान एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल होणार असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात ...
Image
  कासारवडवली आदितीची गगनभरारी !  मुंबई : सतिश पाटील :- ठाणे, घोडबंदर रोड (कासारवडवली) गावचे प्रतिष्ठान व्यावसायिक शिवसेना उपविभागप्रमुख मा.साजन कासार यांची सुकन्या कु आदिती साजन कासार ही पायलट झाल्यावरबद्दल तिचे अभिनंदन करून भावी गगन भरारी साठी शुभेच्छा देताना अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष: आदरणीय श्री.दशरथ दादा पाटील, शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख  श्री.वासुदेव भोईर, प्रख्यात पत्रकार मा.श्री.सतिश वि.पाटील सोबत आदीती चे आईवडील उपस्थित होते. या मेहनती ,हुशार मुलीने आगरी समाजातील विद्यार्थी क्षेत्रातील युवक वर्गाला आदर्श निर्माण केला आहे "मेहनत करने वालो की कभी हार नही होती " आपल्या करीअर मध्ये मेहनत व जिद्द असू दे यशवंत होणारच अथक मेहनत करून या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली .आपल्या देशाचे नाव, आईवडील, समाज व गावाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणे हीच सदिच्छा!  आदितीने 12वी नंतर बाॅम्बे फ्लाईंग क्लब प्रवेश घेतला.नंतर 2020 DGCA परिक्षा पुर्ण केली.पुढे शिकण्यासाठी धुळे 1/2 वर्ष सिंगल इंजिन प्रशिक्षण घेतले.नंतर मल्टी इंजीन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी गुजरात फ्लाईंग क्लब मधून...
Image
  आदिवासी समाजासाठी ‘पीएम जनमन’ व ‘आभा’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार  आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके खालापूर येथे आदिवासी संवाद मेळावा संपन्न; कातकरी समाजासह आदिवासी कुटुंबांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध   रायगड : प्रतिनिधी :- केंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आहे. त्यासाठी १३ विभागांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके  यांनी खालापूर येथे दिले. खालापूर येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात मतदारसंघातील  आमदार महेश बालदि, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएम जनमन’ सारख्या धोरणात्मक योजनांच्या माध्यमातून कातकरी व इतर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारने सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आ...
Image
  गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी  उपलब्ध होणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत  चर्चा मुंबई : प्रतिनिधी :-  महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते. महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक रूपांतर करून त्यांचे आयपी (...
Image
  आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली 2025  मुबंई : सतिश पाटील :- आगरी समाज वधूवर सामुदायिक विवाह सोहळा गेल्या पाच वर्षांपासून अविरत समाज कार्य कार्य करीत आहेत. एका मंचावर आतापर्यंत 7,5,11,9 यंदा 16 सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, उपरोक्त मंडळाचे लक्ष जास्तीत जास्त विवाह करून देण्याचे आहे. यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्ते अविरत दिवसरात्र निमंत्रण व नियोजन ,आगरी वधूवर सुचक मंडळ  करीत आहे पत्रीका बघणे इच्छुक वधूवरांची समोरासमोर बसून भेटीगाठी फोटो ,नातेवाईक समोर बघण्याचा कार्यक्रम होतो. पुढे ठरलेल्या वधूवरांचे विवाह सोहळ्याची पुर्ण जबाबदारी मंडळ स्वीकारते तसेच ज्यांचे  विवाह आधी ठरलाय अशा जोडप्यांना ही प्राधान्य दिले .यंदा 16 इच्छुक वधूवरांचा विवाह सोहळा  पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवलीत मोठया थाटामाटात पार पडला.सर्वात मोठे योगदान मा.राजू दादा पाटील यांचे असते प्रत्येक जोडप्याला एक लाख आहेर स्वरूपात दिला जातो. या विवाह सोहोळ्यात मा.राजू दादा पाटील, मा.सुरेश पाटील (बाळ्या मामा) विद्यमान आमदार मा.राजेश मोरे , मा.रमेशसेठ पाटील,मा.प्रल्हाद म्हात्रे यांचे य...
Image
  महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा : प्रतिनिधी :- महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने, अतिरिक्...