Posts

Image
 कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335  रायगड : प्रतिनिधी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकार...
Image
  जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट: कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना रायगड : प्रतिनिधी :-  रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूूचना त्यांनी यावेळी केल्या.  यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी  रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते, किती रुग्णांना संदर्भाकित केले जाते, त्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली. या शिवाय काही रुग्णांशी संवादही साधला.  दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या, विनाकारण रुग्णांना संदर्भाकित करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत. तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणुक द्यावी. एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूच...
Image
 
Image
 
Image
  रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी रायगड : प्रतिनिधी :- भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर...
Image
  भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन रायगड : प्रतिनिधी  :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' ची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist ट्रेन अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहॆ.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. या 5 ...
Image
  अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी रायगड : प्रतिनिधी  :- अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग ते धरमतर या मार्गांवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन  जावळे यांनी याठिकाणी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, या मार्गांवरून मांडवा जलवाहतूक सेवा, पर्यटकांची वाहने तसेच डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सारखी अवजड वाहने एकाच वेळी ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता, दि. १७ व १८ मे २०२५ आणि दि. २४ व २५ मे २०२५ या दोन आठवड्यांत सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत या मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे. ही व...