Posts

Image
  खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय बँगचे वाटप. तळा : नझीर पठाण :- खासदार सुनिल तटकरे यांचा १०जुलै जन्म दिन असून पुर्व संधेला पिटसई  ल.लोखंडे हायस्कूल व तळा उर्दू हायस्कूल येथे शालेय दफ्तर(स्कूलबँग)वाटप मंगळवार दि.८जुलै रोजी  करण्यात आले. यावेळी तन्वीर पल्लवकर, आयशा पल्लवकर एँड.उत्तम जाधव माजी महिला बालकल्याण सभापती जि.प.गिताताई जाधव,तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,जगदिश शिंदे, चरईसरपंच प्रवीण आंबार्लै, गिरणे उपसरपंच,नागेश लोखंडे,उर्दु हायस्कूल चे मुख्याध्यापक लोखंडे सर सह शिक्षक व पिटसई हायस्कूल चेअरमन खेळु वाजे,सदस्य मनोहर गायकवाड मुख्याध्यापक खुळपे सर,सह शिक्षक शिक्षीका विद्यार्थी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो.तळा येथे वाढदिवसाचे औचित्यसाधून पाककला कृती स्पर्धाचे आयोजन दि.१२जुलै२५रोजी केले आहे. या मधून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन वेगवेगळी कला दाखवण्याची संधी मिळते व आकर्षक बक्षीसे देऊन मनोबल वाढविण्यासाठी मदत होते.रायगडात खासदार तटकरे साहेबांचा वाढदिवस म्हणजे अबालापासून जेष्ठ नागरिक...
Image
  आईबाबा प्रतिष्ठान तर्फे वह्या व शालेय वस्तू वाटप !  मुबंई : (सतिश पाटील) :- मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळाव्यात, या दृ ष्टीकोनातून ॐ श्री स्वामी उदयानंदगिरी पंचमुखी शिवमंदिर आणि आई बाबा प्रतिष्ठान तर्फे  "मोफत वह्या वाटप" हा अभिनव उपक्रम  राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पंचमुखी शिव मंदिराचे विश्वस्त श्री. अनिल विठोबा वैती आणि  श्री. महेंद्र विठोबा वैती यांच्या शुभ हस्ते मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नवघर कोळीवाडा, मुलुंड पूर्व येथे संपन्न झाला. शैक्षणिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हि अनिल विठोबा वैती  यांची कृतज्ञता कौतुकास्पद असून, मोफत वह्या व शालेय वस्तू वाटप या अभिनव उपक्रमाचे सौ. अंकित निमा यांनी कौतुक केले. दरम्यान शहरातील सर्व भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे अनिल विठोबा वैती  यांनी या वेळी सांगितले. या वह्या वाटप कार्यक्रमासाठी  विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Image
  छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पळसधरी येथे वृक्षारोपण राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम पळसधरी (कर्जत) पंकेश जाधव :  दिनांक 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने पळसधरी येथे वृक्षारोपणाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक न्याय, समता आणि पर्यावरण संवर्धनाचे भान जपत फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन "झाडे लावा, झाडे जगवा" या प्रेरणादायी घोषवाक्यासह नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. या उपक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजा प्रताप सुर्वे यांच्यासह सौ. सुवर्णा सुर्वे, दिव्यांशू सुर्वे, कांचन देशमुख, पल्लवी कनोजे, सूरज वाघमारे, मनीषा पवार, शंतनू सुर्वे तसेच परिसरातील महिला, युवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी विविध प्रकारच्या देशी झाडांचे रोपण करून निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन करताना शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून प...
Image
  सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा गौरव रायगड (राकेश हुले)  कर्जत तालुक्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पंकेश मधुकर जाधव यांचा वाढदिवस. सामाजिक न्यायासाठी लढणारे, जनतेच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवणारे आणि आदिवासी, गरीब, महिला, वंचितांसाठी सदैव कार्यरत असलेले डॉ. जाधव यांनी आपल्या निस्वार्थ सेवेतून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ घेऊन त्यांनी शिक्षण घेतानाच सामाजिक कार्यात पाय ठेवला. त्यांचे कार्य हे फक्त कार्यालयीन बैठका किंवा भाषणांपुरते मर्यादित नसून, त्यांनी गावोगाव जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्वतः पुढे सरसावलो. डॉ. जाधव यांनी अनेक गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांचा विशेष भर आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना घरकुल योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, पाणीपुरवठा योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. डॉ. पंकेश जाधव यांनी स्थ...
Image
  कर्जतमध्ये वाहतूक कोंडीबाबत बचाव समितीचे पोलिसांना निवेदन, कर्जत | पंकेश जाधव :-  कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर, कर्जत शहर बचाव समिती वतीने कर्जत पोलिस ठाण्यात आज दिनांक ११ जून रोजी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठ, श्रीराम पूल आणि चारफाटा परिसरातील नो-एंट्रीचे उल्लंघन, ट्राफिकचे अकार्यक्षम नियमन आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी बचाव समितीने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत: यामध्ये बाजारपेठ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ट्राफिक फाईन प्रणाली सक्षम करणे., नो-एंट्री झोनमध्ये टायर किलर बसवणे जेणेकरून अप्रामाणिक प्रवेश थांबवता येईल., श्रीराम पूल व चारफाटा येथे सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे जेणेकरून ट्राफिक पोलीसांवरचा भार कमी होईल., शहरासाठी कायमस्वरूपी ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करणे ही गरज वेळोवेळी अधोरेखित केली जात आहे.,बचाव समितीने कर्जत नगरपरिषद व पोलिस...
Image
  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते  61,125  कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण  पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा--जिल्हाधिकारी किशन जावळे   रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील बँकांनी मार्च 25 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात  प्राथमिकता क्षेत्रासाठी 8 हजार 800 कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट असताना बँकानी 9 हजार 342 कोटी (106%)कर्ज वाटप झाल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी सर्व cबँकांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सर्व बँकांचा आणि सरकारी विभागांचा योग्य समन्वय असल्याने  मोठे उदिष्ट ही साध्य करता येते. असाच समन्वय आणि परस्पर सहकार्य या आर्थिक वर्षात सुद्धा पुढे चालू ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी  किशन जावळे यांनी केले. किसान क्रेडिट कार्डसाठी असणारे रू.625 कोटी उद्दिष्ट  प्रत्येक सरकारी,खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 100 टक्के पूर्ण  करा.  तसेच  मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड देण्याला प्राधान्य द्या, असे सांगून बँकांनी व शासकीय ...
Image
 कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335  रायगड : प्रतिनिधी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335 ला संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  जिल्हयात खरीप हंगाम 2025-26 करीता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषि विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषि अधिकार...