जिल्ह्यातील उद्योजकां सोबत दरमहा जिल्हा उद्येाग मित्र समितीची बैठक
रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजकां सोबत दरमहा जिल्हा उद्येाग मित्र समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केले.जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -2025 कार्यक्रमात रायगड जिल्ह्यात एकूण रु. 2311 कोटी गुंतवणूकीचे सामंजस्य करार झालेले असून यातून एकूण 2865 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून जिल्हा गुंतवणूक परिषद 2025 चे आयोजन जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, –अलिबाग येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या परिषदेकरित उद्योग सह संचालक, कोकण विभाग श्रीमती विजू शिरसाठ,प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्रीमती. मोरे, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, श्री. जी. एस. हरळय्या, स्टेट बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक श्री. विलास शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे 250 पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व सामंजस्य करार धारकांना पुढील गुंतवणूक कालावधीत शासकीय सर्व कामे प्राधान्याने करण्यात येवून पुढील कालावधीत जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यात रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल असे सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात रायगड -जिल्ह्याने प्रथमच 100% उद्दीष्टपूर्ण केल्याने जिल्हा उद्योग केंद्र व सर्व बँकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील आस्तित्वातील सर्व उद्योजकांचे 100 दिवशीय कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या अनुषंगाने समस्या विषयी चर्चा करण्यात आली.
उद्योग सह संचालक, कोकण विभाग,श्रीमती विजू शिरसाठ
यांनी जिल्हा गुंतवणूक परिषदेचे उद्देश व एंकदरीत कोकण विभागातील औद्योगिक विकास व विस्तार याबाबत नमूद करुन मुख्यमंत्री रोजागार निर्मिती कार्यक्रम सारख्या - शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रमात रायगड जिल्ह्याने 100% पेक्षा जास्त उद्दीष्ट यावर्षी साध्य केल्याबद्दल सर्वाचे अभिनंदन केले. उद्योग विभागाने मैत्री 2.0 सारखे अत्याधुनिक पोर्टल मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सुरु केल्याने नविन गुंतवणूकदारांना एक खिडकी सुविधा प्राप्त झालेले आहे.
Comments
Post a Comment