Posts

Image
 इंडो स्काॅट्स ग्लोबल स्कूल तर्फे आरोग्य जनजागृती ठाणे! मुलुंड : सतिश पाटील :- इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या वतीने तलावपाळी येथे आरोग्य जनजागृतीसाठी वॉकाथॉन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वास्थ्याची जाणीव निर्माण करणे आणि स्थूल जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा होता. शाळेच्या प्राचार्या डॉ. निकिता व्ही. कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सर्व सहभागींसाठी वॉकानंतर सौम्य वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. डॉ. अपर्णा चव्हाण (कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट) यांनी श्वसन आरोग्य व हृदयाचे आरोग्य कसे जपावे यावर मार्गदर्शन केले. सुप्रिया केदार (पॅथॉलॉजिस्ट) यांनी नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व स्पष्ट केले. अनुराधा जोशी (न्युट्रिशनिस्ट व फार्मासिस्ट) यांनी संतुलित आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात पालक व व...
Image
  सामान्य जनतेला सेवेचा अधिकार मिळवून देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम   जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड : प्रतिनिधी :- राज्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा या ठरावीक मुदतीत मिळवण्याचा हक्क मिळवून देणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ दशकपूर्ती आणि प्रथम  'सेवा हक्क दिन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक सेवा देणाऱ्या अधिकारी व कार्यालयाचा गौरव करण्यात आला. महसूल विभागाने या अंतर्गत सर्वाधिक ...
Image
 नागोठणे येथे पोलिसांना लागलीय भीक? मटका जुगाराच्या हप्त्यांवर चालतोय पोलिसांचा उदरनिर्वाह?  नागोठण्यात सलाम मटका आणि वाकण नाक्यावर बोंबाट्या मटका  राजरोसपणे सुरू, पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना लाखोंचा हप्ता?  रायगड : विशेष प्रतिनिधी :- नागोठणे येथे पोलीस स्टेशनचे हद्दी मार्केटमध्ये सलाम याचे सात ते आठ मटक्याचे अवैध धंदे तसेच वाकण नाक्यावर बोंबाट्या याचे दोन मटकेची धंदे सुरू असून या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करण्यास का घाबरतात? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. येथील पोलिसांना भीक लागलीय काय? येथून हप्ता घेऊन पोलिसांचा उदरनिर्वाह चालतो का? असे संतप्त सवाल या परिसरातून नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे मटका जुगार चालकांकडून येथील पोलिसांना मजबूत हप्ता चालू असल्याचे बोलले जात आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.  नागोठणे पोलिसांच्या आशीर्वादामुळे हा बेकायदा मटका जुगार चालू असून. येथे सुरू असलेल्या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे. तरी या अवैध धंद्यांविरुद्ध रायगडचे पोलीस...
Image
  कर्जत प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प नाही; नागरिकांमध्ये तीव्र संताप,  पुरवठा व पेन्शन विभाग तळमजल्यावर हलवा, माऊली फाऊंडेशन ची आग्रही मागणी पत्रकार : पंकेश जाधव :- कर्जत : कर्जत येथील प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्यास सोयीस्कर रॅम्पची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासन भवनात येणाऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, तसेच पुरवठा व पेन्शनसंबंधी कामांसाठी भवनात येणाऱ्या नागरिकांना जिना चढणे-उतरणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे. शासकीय कार्यालये ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज पोहोचण्याजोगी असावी, अशी सामान्य अपेक्षा असते. मात्र प्रशासन भवनात रॅम्प नसल्याने अपंग व ज्येष्ठ नागरिकांना शासकीय सेवा मिळविणेच अवघड झाले आहे. काही नागरिकांना तर दुसऱ्याच्या मदतीशिवाय वर जाणे शक्यच राहत नाही. त्यामुळे त्यांना अपमानास्पद व त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या समस्येकडे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र ...
Image
  शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : प्रतिनिधी :- आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी 'पुणे अर्बन डायलॉग' सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित 'पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी ...
Image
  सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना गडचिरोली : प्रतिनिधी : - नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याची जागृती जिल्ह्यात वाढण्यासाठी येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ निमित्ताने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.  राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 पासून लागू केलेल्या लोकसेवा हक्क कायद्याचे उद्दिष्ट नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित सेवा प्रदान करणे आहे. हा कायदा शासकीय विभागांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. यंदा या कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम:  सेव...
Image
  जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी 'सेवा हक्क दिन' कार्यक्रमाचे आयोज रायगड : प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार दि. २८ एप्रिल  रोजी दु.१२ वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग येथे 'सेवा हक्क दिन' साजरा करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री कु. अदिती तटकरे आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा हक्कांबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.